बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) आता प्रेम हे आंधळ झाला आहे पण प्रेमाला वय आता राहिलेच नाही.काही ठिकाणी आई वडील यांचा सुद्धा विचार केला जात नाही.ज्या वयात हातात पुस्तकं आणि मनात स्वप्नं असायला हवीत, त्या वयात एका दहावीत शिकणाऱ्या कोवळ्या मुलीला ‘नराधमाच्या’ वासनेचा बळी ठरावे लागले. बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? हा भीषण प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बुलडाणा शहरातील चंद्रमणी नगर भागातील १६ वर्षीय मुलगी स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेत १० व्या वर्गात शिक्षण घेत आहे. बालपणापासूनच तिचा परिचय भीमनगर भागातील आदर्श नरवाडे (वय १९ वर्षे) याच्यासोबत झालेला होता. ओळखीचा फायदा घेत आदर्शने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नव्हेतर गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी, आरोपीने पीडितेची भेट घेऊन तिला एका निर्जन घरात नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर
बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोवळ्या वयातील त्या मुलीला या संकटाची भीषणता उमजली नाही, मात्र जेव्हा तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि प्रकृती खालावली, तेव्हा तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी आदर्श नरवाडे याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ (२) (एम), ६५ (१), ३५१ (३) आणि बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४ (२), ६, ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील युवराज रबडे हे करीत आहेत. ही घटना म्हणजे आपल्या समाजाच्या
मुलगी गर्भवती राहिल्यान बिंग फुटले….
सडलेल्या मानसिकतेचा आरसा आहे. १९ वर्षांचा तरुण आणि १६ वर्षांची मुलगी… ज्यांना आयुष्याची दिशा कळायची आहे, त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. आरोपीने पीडितेच्या ओळखीचा आणि विश्वासाचा फायदा घेतला. ही ‘प्रेमाची’ व्याख्या असूच शकत नाही. हे कृत्य निव्वळ वासना आणि एका मुलीच्या भविष्याशी खेळणे आहे. आज आपली मुले काय करतात, कोणाला भेटतात आणि त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे का? १० वीत शिकणाऱ्या मुलीला अशा परिस्थितीतून जावे लागते, हे पालकत्वाचेही अपयश आहे. तर दुसरीकडे पोक्सो सारखा कडक कायदा असतानाही अशा घटना थांबत नाहीत, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहेत.














