अंढेरा (नंदकिशोर देशमुख:बुलडाणा कव्हरेज न्यूज) शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लावल्याची घटना १४ जून रोजी दुपारी सुमारे तीन वाजता भरोसा शिवारात घडली. या घटनेमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, अंढेरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.गजानन मुरलीधर भंगो (रा. माळीपुरा, चिखली) यांची भरोसा शिवारात शेती आहे. त्यांच्या शेजारी तुलसीदास दामोदर बळप (रा. रामनगर, चिखली) याचीही शेती आहे. काही दिवसांपासून दोघांमध्ये शेतीच्या हद्दीबाबत वाद सुरु होता.
या वादातूनच १४ जून रोजी आरोपी तुलसीदास बळप यांनी गजानन भंगो यांच्या शेतातील गोठ्यात घुसून आग लावली. या आगीत स्प्रिंकलर, ताडपत्री आणि इतर शेतीसाठीचे साहित्य जळून खाक झाले. शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.