चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे सोमवार, १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ‘विकसित भारत संकल्प मेळावा’ पार पडणार आहे. हा कार्यक्रम भाजपच्या ‘संकल्प से सिद्धी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील ११ वर्षांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमाला चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त, तसेच माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात आणीबाणीत जेलवास भोगलेल्या दाम्पत्यांचा कृतज्ञता सत्कार तसेच राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा मेळावा भाजपच्या ‘संकल्प से सिद्धी तक’ या अभियानाचा भाग असून, विकसित भारताची दिशा व संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यामागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साखरखेर्डा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाघ आणि उप तालुका अध्यक्ष विष्णु घुबे यांनी केले आहे.