स्वागत विद्यार्थ्यांचं हवं –विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांचं नाही! माजी आमदार राहुल बोंद्रे

स्वागत विद्यार्थ्यांचं हवं –विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांचं नाही! माजी आमदार राहुल बोंद्रे

सिनगाव जहागीर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिनगाव जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी काही विद्यार्थ्यांकडून झाडू-फरशी मारून स्वच्छतेचं काम करून घेतल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या प्रकरणावर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. “विद्यार्थ्यांचा पहिला दिवस हा त्यांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय असतो – तो स्वप्नांचा, शिक्षणाचा आणि आनंदाचा असायला हवा. मात्र, काही बेजबाबदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या पवित्र दिवसालाच काळं फासलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी रोष व्यक्त केला.

बुलढाण्यात महाविकास आघाडी एकजुटीने लढणार स्थानिक स्वराज्य निवडणुका: डॉ. राजेंद्र शिंगणे

त्यांनी पुढे म्हटलं, “शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून झाडू-फरशी मारून स्वच्छता करून घेतली जाते – कारण ‘मंत्री येणार आहेत’! मग शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर, की मंत्र्यांच स्वागत केंद्र? शिक्षणाचा पहिला धडा हा झाडू-फडका की गुलामगिरी? हा प्रकार केवळ अन्यायकारक नाही, तर शिक्षणाच्या पवित्र मूल्यांवरच घाला आहे.”

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर शाळा प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे की, “स्वच्छतेचं काम विद्यार्थ्यांकडून नव्हे, तर गावकऱ्यांच्या मदतीने करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतल्याची माहिती चुकीची आहे.”

तथापि, सत्यता काय आहे हे तपासणं आणि या प्रकरणावर शिक्षणमंत्री दादा भुसे काय भूमिका घेतात, हे आता महत्वाचं ठरणार आहे. शिक्षणाच्या मूल्यांचा अपमान होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची आहे, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!