Road Safety Lesson Tragedy: क्षणात कोसळलेलं आयुष्य, अपघाताचा जीवघेणा आघात आणि एका स्वप्नाचा अंत

Road Safety Lesson Tragedy: क्षणात कोसळलेलं आयुष्य, अपघाताचा जीवघेणा आघात आणि एका स्वप्नाचा अंत

संपादकीय (Road Safety Lesson Tragedy): एका तरुण मुलाची गोष्ट, जो बेंगलोरच्या एका प्रसिद्ध विद्यापीठात एम.टेकचे शिक्षण घेत होता. तो देखणा, हुशार आणि महत्वाकांक्षी होता. अवघ्या काही महिन्यांत त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळणार होती. पुढच्या वर्षी परदेशातही करिअर करण्याची त्याची स्वप्ने होती. त्याच्या आईच्या डोळ्यांत त्याच्या लग्नाची रंगीत स्वप्ने तरळत होती. वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. सगळं कसं आनंदात आणि समाधानात सुरू होतं.

रस्ता सुरक्षेचा धडा देणारी शोकांतिका (Road Safety Lesson Tragedy)

पण नियतीला काही वेगळंच लिहायचं होतं. २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना एक अनपेक्षित फोन आला. मुलाच्या मित्राने काळजाला चर्रकन भिडणारी बातमी सांगितली, “तुमच्या मुलाचा अपघात झालाय. डोक्याला गंभीर जखम झाली आहे. लवकर बेंगलोरला या.” ही बातमी ऐकून वडिलांचं मन सुन्न झालं. कसं तरी स्वतःला सावरत ते बेंगलोरला निघाले. पण प्रवास लांबचा होता; दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच ते पोहोचू शकणार होते. त्या रात्रीच्या प्रवासात त्यांच्या मनात काय त्सुनामी आली असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

अपघातानंतर मुलाच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. वडील रस्त्यात असतानाच दुसरा फोन आला, “डॉक्टर म्हणाले, मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल. पण ऑपरेशन केलं तरी पेशंट वाचण्याची फक्त एक टक्का शक्यता आहे.” वडिलांनी एका क्षणात निर्णय घेतला. त्यांनी रुग्णालयात पैसे जमा केले आणि बेंगलोरमधील नामांकित न्यूरोसर्जनला ऑपरेशनची परवानगी दिली.

MORNING BREAKING! खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

दुसऱ्या दिवशी दुपारी वडील रुग्णालयात पोहोचले. मुलगा आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होता. डॉक्टरांनी सांगितलं, “पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. जर शरीराने काही प्रतिसाद दिला, तरच पुढचे उपचार शक्य होतील. नाहीतर…” वडिलांचं काळीज धडधडत होतं. नातेवाईकांनी प्रार्थना सुरू केली, मंदिरात दिवे लावले. आणि खरोखरच चमत्कार घडला. मुलाने हलकेच तोंड हलवलं. सर्वांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला. काही वेळाने मुलाने डोळे उघडले. ही बातमी ऐकून आईला तातडीने महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलावलं. आपल्या मुलाला हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा हलकासा प्रतिसाद पाहून तिच्या जीवात जीव आला.

उपचार सुरू झाले. रोज लाख-दीड लाखांचा खर्च येत होता. वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं, “कितीही पैसे लागले तरी चालतील, फक्त माझ्या मुलाला वाचवा.” २३ सप्टेंबरपासून मुलाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. आठवड्याभरात व्हेंटिलेटर काढलं, त्यानंतर काही दिवसांनी ऑक्सिजनही बंद झालं. मुलाने स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली. तो हात-पाय हलवू लागला, डोळे फडफडवू लागला. डॉक्टरांनी सांगितलं, “आता पेशंट धोक्याबाहेर आहे. दोन-तीन दिवसांत त्याला आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलवू.”

पण नियतीला सुखाचे क्षण जास्त काळ सहन होत नव्हते. १३ ऑक्टोबरला अचानक मुलाच्या फुफ्फुसात संसर्ग झाला. पुन्हा व्हेंटिलेटर लावावं लागलं. गेल्या २२ दिवसांपासून सततच्या हाय डोस अँटिबायोटिक्समुळे त्याचं शरीर औषधांना प्रतिसाद देईनासं झालं होतं. संसर्ग आटोक्यात येणं आता अशक्य होतं. डॉक्टरांनी वडिलांना सांगितलं, “पेशंटची अवस्था गंभीर आहे.” वडील हताश होऊन रडू लागले. गेल्या काही दिवसांत त्यांनी कित्येकदा आपलं दुःख लपवत रडून घेतलं होतं. मुलाची गंभीर अवस्था आईपासून लपवण्यासाठी त्यांनी तिला १५ ऑक्टोबरलाच घरी पाठवलं.

१६ ऑक्टोबरचा काळा दिवस उजाडला. सकाळी १०:३० वाजता उपचारादरम्यान त्या मुलाचा जीव गेला. इथून सगळ्या अडचणींना सुरुवात झाली. मुलाच्या मृत्यूची बातमी त्याच्या आईपर्यंत पोहोचू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. कारण ती ही बातमी सहन करू शकणार नव्हती. पण हळूहळू ही बातमी नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पसरली. रुग्णालयाचं प्रचंड बिल, पोलिस परवानग्या, पोस्टमॉर्टेम यासारख्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तब्बल २४ तास लागले. अखेर १७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता मुलाचं पार्थिव घेऊन वडील, काही नातेवाईक आणि मुलाचे मित्र रुग्णवाहिकेतून कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले.

घरी पोहोचायला १४ तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. तिला मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन होणं अशक्य होतं. अखेर रुग्णवाहिका जवळ येताच रात्री ९:३० वाजता डॉक्टरांच्या उपस्थितीत तिला ही बातमी सांगण्यात आली. तिच्या आकांताने सगळं रुग्णालय हादरलं. ती रडता रडता बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेव्हा पुन्हा हंबरडा फोडला. तिचं लाडकं आता कायमचं गेलं होतं. तिने त्याच्यासाठी पाहिलेली स्वप्ने आता फक्त आठवणी बनून राहिली.

Womens Day Special: यूट्यूबवरून महिन्याला ५ ते ६ लाख रुपये कमावणाऱ्या सुमन आजींची गोष्ट, ७४ वर्षीय आजींचा प्रेरणादायी प्रवास

१७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिका मुलाचं पार्थिव घेऊन गावी पोहोचली. वडिलांच्या मनात अपराधी भावना होती. ते काय तोंड दाखवणार होते मुलाच्या आईला? “मी तुझं लेकरू वाचवू शकलो नाही,” असं म्हणत त्यांनी मिठी मारली आणि दोघांच्याही रडण्याने सगळ्यांचं काळीज पिळवटलं. रात्री १:३० वाजता शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत मुलावर अंत्यसंस्कार झाले. नातेवाईक आणि मित्रांनी डोळ्यात अश्रू घेऊन त्याला निरोप दिला. त्या तरुणाच्या चितेला फेरे मारताना वडिलांचं हृदय किती जखमी झालं असेल, याची कल्पनाही करता येत नाही.

पोरांनो,

गाडी चालवताना ऍक्स्लेटरच्या मुठीला पीळ द्यायच्या आधी, आतडी पिळवटून रडणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्यांचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे, त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आई बाप बहुमूल्य आहेत. आपल्या शिवाय त्यांचे काय होईल याचे भान ठेवा. एवढी वाईट वेळ कुणावरही येवू नये.

Join WhatsApp

Join Now
WhatsApp Join Group!