पेरणीच्या हंगामात शेतजमिनीवरून वाद तीव्र; अंढेरा पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल

तू दगड लावू नको, इथून निघून जा,आता लगेच याला जीवाने सोडत नाही! असे म्हणत म्हणत डोक्यात लोखंडी रॉड ने जोरदार.....

अंढेरा, (बुलडाणा कव्हरेज न्यूज): पावसाळ्याच्या तोंडावर आणि पेरणीच्या हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील मनुबाई शिवारात शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये तीव्र वाद उद्भवला आहे. या वादाने आता कायदेशीर वळण घेतले असून, दोन्ही पक्षांनी अंढेरा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत. परिणामी, पोलिसांनी परस्परविरोधी कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

प्रकरणानुसार, मनुबाई शिवारातील गट क्रमांक ९३ मधील शेतजमिनीच्या ताब्यावरून नामदेव वायाळ आणि रावसाहेब वायाळ यांच्यात तंटा निर्माण झाला. नामदेव वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जमिनीवर पेरणी करण्यास त्यांनी रावसाहेब वायाळ यांना अडवले असता, रावसाहेब आणि त्यांच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

यावरून नामदेव यांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल केली. दुसरीकडे, रावसाहेब वायाळ यांनीही नामदेव यांच्याविरोधात तक्रार नोंदवली असून, त्यांनीही शिवीगाळ आणि धमक्यांचे आरोप केले आहेत. या परस्पर तक्रारींमुळे पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती देण्याऐवजी पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. अशा वादांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याची चर्चा गावात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!