BREAKING: चिखली मतदारसंघात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता! डॉ शिंगणेचा 22 गावातील एकमेव विश्वासू भाजपच्या वाटेवर?

BREAKING: चिखली मतदारसंघात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता! डॉ शिंगणेचा 22 गावातील एकमेव विश्वासू भाजपच्या वाटेवर?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिदंखेडराजा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागला. गेली २५ वर्षे “साहेब आणि सत्ता” हे समीकरण पक्कं होतं, पण यावेळी नवख्या मनोज कायंदे यांनी दिग्गजांना धूळ चारली. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेतली आणि तोच निर्णय त्यांच्या अंगलट आला.  तज्ञांच्या मते जर त्यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला असता, तर सिंदखेडराजा मतदारसंघाचं चित्र वेगळं दिसलं असतं. पण राजकारणात “जर-तर” चालत नाही, जे झालं ते झालं!

शिंगणे समर्थक काय करणार?

सत्तेपासून दूर राहून पुढची पाच वर्षे कशा प्रकारे काढायच्या, जनसेवा कशी करायची, हा प्रश्न शिंगणे आणि त्यांच्या समर्थकांसमोर उभा राहिला आहे.चिखली मतदारसंघात तर काहींनी त्यावर तोडगा काढला सुद्धा .तर सिदंखेडराजा मतदारसंघातील विशेष म्हणजे चिखली तालुक्यातील 22 गावातील काही जण वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते!

भाजपच्या वाटेवर असलेला  नेता कोण?

सिंदखेडराजा मतदारसंघात चिखली तालुक्यात येणाऱ्या गावांमध्ये अनेक राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी आहेत.त्यातील काहीजण  भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची खमंग चर्चा यापूर्वी ऐकायला मिळाली होती परंतु भाजपने त्यांच्यासाठी  दरवाजे उघडलेच नाही त्याला कारणही तसेच आहे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना भरपूर दिले प्रसंगी आपल्या कार्यकर्ता नाराज होणार नाही यासाठी बिनशर्त मदत करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घेतली होती त्यामागे सुद्धा याच 22 गावातील भाजपच्या वाटेवर असलेला नेताच होता हे सुद्धा स्पष्ट झाले .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करता,त्या नेत्याने भाजपमध्ये जाण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

राजकीय समीकरणे बदलणार?

या वेळी चिखली मतदारसंघातील २२ गावांत शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आघाडीवर होते, तर मागील वेळी डॉ. शिंगणे पुढे होते. आता राज्यात आणि केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः भाजपमध्ये जाणाऱ्यांचा ओढा जास्त आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रभाव?

सिंदखेडराजा मतदारसंघातील काही गावे २०२६ मध्ये होणाऱ्या पुनर्रचनेनंतर चिखली मतदारसंघात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. चिखली भाजपसाठी अनुकूल असल्यामुळे आणि आमदार श्वेताताई महाले यांचे माहेर “मेरा बु” याच 22 गावातील असल्याने, त्यांच्या माध्यमातून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यास हा निर्णय निश्चित होईल.

आता पाहायचं, पुढच्या काही दिवसांत राजकारणात आणखी कोणते नवे बदल होतात!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!